![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
संघर्षमय जिवन कार्याचा जीवनपट आजही जिवंत !
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) ध्येय वेडी ” रत्ने ” जेव्हा ध्येयाने पछाडतात त्यावेळी त्यांना समाज कार्यात आपले समाज बांधव तसेच इतर जाती बंधू भगिनी आपल्या जीवनाचे , कुटुंबाचे अविभाज्य घटक आहेत , हेच दिसत असते . सामाजिक बांधिलकी जपत आपण या समाजाचे ऋणी आहोत , समाजाप्रती काहीतरी केले पाहिजे , ही तळमळ सतत ” ज्योती ” प्रमाणे त्यांच्या अंतर्मनात तेवत असते . मात्र आपले शरीर त्यागाचे कार्य करून झिजवणारे या समाजात हाताच्या बोटावर आपण पहात असतो .त्यातीलच एक ध्येयाने पछाडलेला शिल्परत्न म्हणजे शिल्पकार साहित्य कला मंडळाचे संस्थापक अध्यक्ष – साहित्यिक – शीघ्र कवी – समाजरत्न – समाजसेवक – एक योध्ये पी.ए.घोडके उर्फ जीवन घोडके यांच्या संघर्षमय जीवन कार्याचा जीवनपट सर्वांना सर्वश्रुत व्हावा , व अश्या गुरुप्रती आपली दृढ भावना – आपली निष्ठा – आपले प्रेम अधिक घट्ट होण्यासाठी त्यांच्या कार्याचे चिंतन – मनन करून आज त्यांचे स्मृती दिनाचे चौथे वर्ष येऊनही आजही त्यांचे कार्य जिवंत असताना दिसत आहे.
कर्जत तालुक्यातील वेणगाव हे पांडुरंग ऊर्फ जीवन घोडके यांची जन्म व कर्म भूमी . त्यांचा जन्म ०१ ऑक्टोबर १९५२ रोजी झाला , तर ते २४ एप्रिल २०२१ रोजी त्यांचे परिनिर्वान झाले , ” पांडुरंग अर्जुन घोडके ते जीवन घोडके ” हा त्यांचा संघर्षमय प्रवास पाहणारे खूप असतील पण त्यांची ती समाजाप्रती असलेली तळमळ हे पाहण्याचे सौभाग्य त्यांच्या मुलांना मिळाले व कुटुंबाला लाभले हे त्यांचे भाग्यच . त्यांच्या कुटुंबात आई – वडील , काका – काकू आणि बहीण असे मोठे कुटुंब परिवार त्या काळात होता . गरिबी असल्याने शिक्षण घेण्यास अनंत अडचणी येत असे , मात्र त्यांना शिक्षणाची आवड असल्यामुळे वडिलांनी त्यांना घरातून शिकवण्यास सुरुवात केली . परिस्थिती हलाखीची असल्यामुळे खूप संकट आली पण अशा परिस्थितीत इयत्ता चौथीपर्यंत त्यांनी शिक्षण घेतले , पुढे शिकायची ईच्छा होती पण त्यांचे वडील मयत झाले आणि त्यांचे शिक्षण तिथेच थांबले . परंतु न डगमगता त्याही परिस्थितीत आईची व बहिणीची जबाबदारी घेऊन लहान वयात कामे करणे , त्यातूनच वाचनाचा छंद जोपासत ” छत्रपती शिवाजी महाराज – डॉ.बाबासाहेब आंबेडकर – फुले – शाहू – तथागत भगवान बुद्ध – संत कबीर – संत गाडगे बाबा – संत रोहिदास – स्वामी विवेकानंद ” यांची पुस्तके वाचून आणि बाबासाहेबांची गीते व भजन – कीर्तन – भक्ती गीते – ऐकून त्यातून वाद्य संगीत यांची आवड निर्माण झाली . मुळातच वाचनाची आवड , संगीताची आवड त्यांच्या साधारण वयाच्या १६ व्या वर्षी लागताच अनेक कार्यक्रम त्यांनी एक गायन संघ मित्र परिवाराच्या बरोबरीने तयार केला . हरिश्चंद्र सोनावणे , बळीराम सोनावणे , अशोक गवळे , तानाजी गायकवाड , जानू गायकवाड , रामचंद्र गवळे , मोरेश्वर जाधव हे सगळे मिळून कोणाच्या शेतात , कुणाच्या घरात , तर कोणाच्या भातखळ्यात वाद्य घेऊन ताल धरून गायनाला शिकले.
पण जीवन घोडके यांना कलावंत होण्यास तसेच वाद्य कलेत पारंगत होण्यासाठी कोणताही गुरु नसताना ” भगवान बुध्दांप्रमाणे निसर्गाला ” आपला गुरु मानून तबल्यावर ” थाप ” मारली तर ” ताल ” निघाला , पेटीवर बोट चालविली तर ” स्वर ” निघाले , ढोलकीवर हात बरसला तर ” नाद ” निनादले आणि मग भजनाचा ताल धरून ते पेटी तसेच तबला – ढोलकी वाजवायला शिकले . त्यांच्या पहाडी आवाजात परिसर दुमदुमून निघाला , त्याही परिस्थितीत ” शीघ्र कवी ” म्हणून विठ्ठलजी उमप , प्रल्हादजी शिंदे , यांच्या बरोबर ते गायनाला बसत होते.
बँकेत नोकरीला असूनही बहुजन समाजा प्रती त्यांचे प्रेम आणि बांधीलकी जपत भारतीय बौद्ध महासभा , रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , कॉम . नाना ओव्हाळ यांच्या बरोबर भारतीय कम्युनिस्ट पक्ष यांत काम करून गावोगावी जाऊन बौद्ध धर्माचा प्रचार – प्रसार – प्रबोधन केले . ” जयभीम ” चा नारा त्यांनी सर्वदूर पसरवला . ” क्रांती संघर्षाचे नेते कॉम. नाना ओव्हाळ ” सारख्या मोठ्या विद्वान माणसाचा सहवास त्यांना लाभला . कुठे मोर्चे तर कुठे उपोषणे करून त्यांनी समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला . रस्ते , वीज , पाणी , एस टी सेवा , अन्याय , अत्याचार या विरोधात त्यांची उपोषणे बबन गुरुजी गायकवाड , गोपीनाथ ओव्हाळ , गोपाळ शेळके यांच्या सोबतीने चांगलीच गाजली . त्यांच्या सर्व कार्यात सावली सारखी बरोबर असणारी त्यांची पत्नी सुमन व मुले प्रेरणा – अभिनय – अश्विनी – प्रगती व प्रणित यांची साथ त्यांना नेहमीच मोलाची होती.
समाजात जाऊन कलाकारांना न्याय देण्यासाठी त्यांनी सन २०१० ला ” शिल्पकार साहित्य कला मंडळ ” स्थापन केले , त्यासाठी त्यांनी २०१० ला आपल्या बँकेतील नोकरीचा राजीनामा दिला .त्यांचा शिल्पकार साहित्य कला मंडळ स्थापन करण्याचा उद्देश असा होता की , जे कलाकार ऐन तरुणपणी कलाकार म्हणून जगतात मात्र वृद्धापकाळात त्यांचे जीवन खूप खडतर होते , त्यांना शासनाकडून पेन्शन योजना , किंवा इतर काही मानधन , आधार सुरू करणे , असा त्यांचा मानस होता आणि त्यात ते यशस्वीही झाले . ते एक शीघ्र कवी होते , त्यांचे शिष्य गायक विजय ढोले , अशोक सोनावणे आणि दिवंगत चंद्रकांत पवार यांच्या बरोबरच ते अनेकांचे गुरुवर्य होते . सत्य हे कानाने ऐकून समजत नाही , तर डोळ्यांच्या नजरेने समजते , हे त्यांना उमगले असल्याने बुद्ध धम्मा नुसार त्यांनी सत्याचा शोध घेण्यासाठी अनेक वर्ष ” ध्यान धारणा ” केली , त्यात ते यशस्वी देखील झाले . अखेरच्या क्षणी त्यांना त्यांचा परीनिर्वाण दिसू लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आता शिल्पकार साहित्य कला मंडळाचे काय होणार ? अशी काळजीची छटा दिसू लागली होती , अश्या या महान रत्नाचा जीवनपट संघर्षमय होता. पी.ए.घोडके तथा जीवन घोडके या संघर्षमय नायकाचा – कलाकाराच्या जीवनपटाचा परिनिर्वाण २४ एप्रिल २०२१ म्हणजे त्यांनी स्थापन केलेल्या शिल्पकार साहित्य कला मंडळ या वर्धापन दिनीच झाला.
या जीवन रुपी वट वृक्षाला सामजिक – शैक्षणिक – राजकीय – धार्मिक व सांस्कृतिक कार्य करून घोडके परिवार , त्यांचे शिष्य व शिल्पकार साहित्य कला मंडळ आज हि खतपाणी घालून त्यांचे कार्यास बहार आणत आहेत . ” स्वच्छ पेहराव व हातात काळी छत्री ” हि त्यांची छबी आज ही सर्वांना आठवत आहे , कर्जत मधील ” विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ” यांचे स्मारक होण्याच्या कार्यास त्यांचा खूप मोठा वाटा आहे . त्यांच्या सर्व क्षेत्रातील अव्वल कार्यामुळे व काव्य रूपाने ” काव्य सुमने ” आज ही या समाज रत्नाच्या स्मृती ” चतुर्थ स्मृती ” दिनीही अजरामर आहेत . त्यांच्या अजरामर कार्यास विनम्र अभिवादन !