तळेगाव(प्रतिनिधी): आंबी एमआयडीसी मधील ए.एम.एन.एस इंडिया कर्मचारी संघटनेच्या नामफलकाचे अनावरण आमदार सुनील शेळके यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले.
“कामगारांच्या धोरणांमध्ये झालेल्या बदलांमुळे सर्वच क्षेत्रातील कामगारांनी संघटित होणे गरजेचे बनले आहे.भूमिपुत्रांना प्राधान्य मिळाले पाहिजे यासाठी संघटनांनी देखील आग्रही रहायला हवे.अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या कामगारांची संघटना होऊ नये यासाठी प्रयत्न करत असतात.हे अत्यंत चुकीचे आहे. कामगारांना त्यांचे अधिकार व हक्क मिळालेच पाहिजेत.
त्यापासून वंचित ठेवण्याचा जेव्हा प्रयत्न होतो तेव्हा कामगार व व्यवस्थापन यांच्यामध्ये असंतोष निर्माण होतो. त्यामुळे संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्येही सहकार्य व समन्वयाची भुमिका असावी.कामगारांसोबत बांधिलकी जपत कामगारांच्या हिताची धोरणे राबविण्यासाठी संघटनेने एकजूटीने प्रयत्न करावेत.”असे प्रतिपादन आमदार शेळके यांनी केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष दिपक हूलावळे, भरतभाऊ घोजगे, सरपंच माधुरीताई जाधव, उपसरपंच प्रदीप बनसोडे, रविंद्र घोजगे, विक्रम कलावडे,बाबा घोजगे, दिपक वारिंगे,समीर जाधव,सुनिल वारिंगे, संतोष दाभाडे,निलेश मराठे,रुपेश घोजगे, भानुदास दरेकर, संघटनेचे अध्यक्ष अनिल वारिंगे, उपाध्यक्ष विजय मराठे, सर्व पदाधिकारी व कामगार बंधू उपस्थित होते.