if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे उल्लेखनीय कार्य…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत शहरातून जाणाऱ्या उल्हास नदीमुळे पावसाळ्यात होणाऱ्या अतिवृष्टीमुळे शहराला व आजूबाजूच्या प्रभागाला पुराच्या पाण्याचा फटका आजपर्यंत बसत असताना अनेक कर्जतकर बेसावध असताना घरात पाणी शिरून नशिबाने जीवितहानी न होता फक्त मोठ्या प्रमाणात घरातील किंमती वस्तूंचे नुकसान होत होते.
नागरिकांच्या होणाऱ्या नुकसानीचे व त्यांच्या सुरक्षिततेची वेळीच ठोस उपाययोजना केल्यास पुराच्या पाण्याचा संभाव्य धोका होणार नाही , हे आपल्या चाणाक्ष बुद्धीने ओळखून कर्जत – खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी उल्हास नदी संवर्धन या उपक्रमाच्या माध्यमातून शहरातून जाणाऱ्या उल्हास नदीच्या पात्राची रुंदी व खोली वाढवून झाडी झुडपे , कचरा , माती , दगडगोटे काढून व नदीचे कोपरे व्यवस्थित बनविले होते , त्यामुळे यावर्षी अतिवृष्टी होऊनही पूर सदृश्य परिस्थिती दिसली नाही.
आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी वेळीच केलेल्या या महान कार्यामुळेच हे संभाव्य होऊ शकले व आज कर्जत शहर व कर्जतकर सुरक्षित असल्याच्या प्रतिक्रिया सर्व देत आहेत.आमदार महेंद्रशेठ थोरवे यांच्या माध्यमातून उल्हास नदी संवर्धनाची मोहीम मे महिन्यामध्ये हाती घेण्यात आली होती , म्हणूनच यामुळे यावर्षी कर्जत शहरामध्ये पूरस्थिती निर्माण झाली नाही . मागील २ वर्षांपूर्वी संपूर्ण कर्जत शहरांमध्ये पुराच्या पाण्याने प्रचंड नुकसान झाले होते याची दक्षता घेऊन आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी हे पाऊल उचलून एक अत्यंत सुनियोजित मोहीम हाती घेतली होती.
या मोहिमेमध्ये कर्जत न.प. चे नगरसेवक संकेत भासे , शिवसेना कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे , दिनेश कडू , शहर संघटक नदीम भाई खान यांनी पुढाकार घेऊन आमदार महेंद्र शेठ थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः दिवसरात्र मेहनत घेऊन ही मोहीम यशस्वी पार पाडली . म्हणूनच आज कर्जतकरांची सुरक्षितता अबाधित राहिली.
कर्जत शहरातील उल्हास नदी शेजारील भगवान टॉकीज , कोतवाल नगर , आमराई , गणेश घाट , बामचा मळा , दहीवली परिसर , मुद्रे , आदी परिसर आज नदी सुरळीत केल्याने सुरक्षित राहिल्याने कुठलीच मनुष्यहानी व वित्तहानी झाली नाही . यामुळे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचे सर्व स्तरातून आमदार साहेबांच्या कामाचे कौतुक होत आहे .