![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
विकासकाचे टेकडीवरील खोदकामामुळे स्थानिकांचा जीव टांगणीला , निवेदन देऊनही तहसीलदार धनंजय जाधव यांचे काम बंदी नाही…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) ” इरशाल वाडी ” येथे अनेक कुटुंबांचा जीव डोंगर पोखरल्यामुळे झाल्याने डोंगर पोखरणे , वस्ती असलेल्या ठिकाणी डोंगर उत्खनन करणे यास राज्य सरकारने बंदी आणली असताना कर्जत तालुक्यातील हाकेच्या अंतरावर असलेल्या किरवली या गावात बौद्ध वस्ती असलेल्या ठिकाणी वस्तीच्या वर असलेला डोंगर जेसीबी व पोकळन लावून डोंगर उत्खनन करणाऱ्या विकासका विरोधात ” कर्जत तहसीलदार धनंजय जाधव ” यांच्याकडे तक्रात अर्ज करूनही काम बंद न केल्याने येथे ” इर्शाल वाडी ” सारखी भयंकर घटना घडण्याची वाट बघतात का ? असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ राहुल गायकवाड व किरवली ग्रामस्थांनी केला असून झालेल्या अवकाळी पावसामुळे या डोंगरावरची उत्खनन व डोंगर पोखरलेली सर्व माती जवळजवळ ३५ घरांत गेली असल्याने बघ्याची भूमिका घेणाऱ्या तहसीलदार धनंजय जाधव यांच्या काम बंद न करण्याच्या भूमिकेचा राहुल गायकवाड यांनी संतप्त शब्दात निषेध व्यक्त केला . तर झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी , अशी मागणी त्यांनी केली आहे.
कर्जत तालुक्यातील किरवली गावाच्या मागे असलेल्या टेकडीवर सर्वे नंबर 50 /4 ब मौजे किरवली विशाल गणपत कोकाटे यांच्या जागेत अनेक महिने खोदकाम सुरू आहे. त्या खोदकामाबद्दल स्थानिक रहिवाशांनी आमच्याघरांना व आमच्या जिवाला धोका आहे , असे कर्जत तहसीलदार यांना पत्र देऊन आमच्या घरावर माती वाहून येण्याची व डोंगर कोसळण्याची भीती व्यक्त केली होती. मात्र महसूल विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अवकाळी पावसामुळे किरवली गावातील अनेकांचे घरांमध्ये पाणी आणि माती शिरली आहे. सदरचे काम अद्यापी बंद करण्यात आले नसल्याने टेकडी खोदण्याचे काम पोकलेन मशीनच्या साहाय्याने केले जात असताना ते खोदकाम तत्काळ बंद करावे, या मागणीकडे तहसीलदार धनंजय जाधव यांनी दुर्लक्षित करून फक्त पाहणीसाठी मंडल अधिकारी वैशाली पाटील, तलाठी वैशाली मांटे, तलाठी आकाश काळे तसेच कोतवाल सुनील गायकवाड यांनी येवून प्रत्यक्ष पाहणी केली. विशेष म्हणजे याच परिसरात २००५ मध्ये दरड कोसळली होती. इर्शाल वाडीची घटना ताजी असताना हे होत असलेले खासगी डोंगर पोखरण्याचे काम बेकायदेशीर असून तात्काळ यावर बंदी आणावी , अन्यथा याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा किरवली ग्रामस्थ राहुल गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली असून हे उत्खनन करण्यास कुणी परवानगी दिली आहे , याचा खुलासा व्हावा , असे माहिती अधिकार अर्ज करून मागणी केली आहे.
सदरचे निवेदन रायगड जिल्हाधिकारी , कर्जत प्रांत अधिकारी संकपाळ , कर्जत तहसीलदार धनंजय जाधव यांना दिले असून हे काम तात्काळ बंद करावे , अश्या निवेदनावर राहुल गायकवाड , रोशन गायकवाड , शैलेंद्र जाधव , दीपक सोनावळे, प्रकाश सोनावले, शरद गायकवाड, विजया सोनावले, रंजना सोनावळे, नीलिमा गायकवाड, सुवर्णा गायकवाड, किरण गायकवाड, कल्पेश गायकवाड यांच्या सह्या आहेत.