![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
” सेंट जोसेफ शाळेची मान्यता रद्द करा “
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात ” इंग्रजी शाळेचे ” मोठ्या प्रमाणात बस्तान असून ” अवाढव्य फी ” घेणाऱ्या या शाळा विद्यार्थ्यांच्या पालका कडून फक्त पैसा खेचण्याचे काम करत असतात . मात्र शालेय विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच त्यांच्या सुरक्षेचा मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे . याकडे दुर्लक्ष होत असल्यानेच अलिकडील काळात काही अनुचित संतापजनक घटना घडल्या आहेत . सेंट जोसेफ स्कुल, लोधीवली हया शाळेतील कर्जतच्या मुलींवर बसमध्ये घडलेला ” लैंगिक प्रकार ” हा चुकीचा व गंभीर आहे. यासाठी सदर शाळा देखील तेव्हढीच दोषी असल्याने शाळेची मान्यता रद्द करून प्राचार्य / मुख्याध्यापकावर देखील गुन्हा दाखल करावा , अशी मागणी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे प्रदेश उपाध्यक्ष ऍड. कैलास मोरे यांनी मा.जिल्हाधिकारी रायगड व शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे केली आहे.
बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना शाळेत तसेच विद्यार्थ्यांना ने – आण करणाऱ्या बसेस मध्ये , शाळेत व शाळा परिसरात सीसीटीव्ही कॅमेरा , तक्रार पेटी , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चारित्र्य पडताळणी अहवाल तर शाळा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज ठराविक अंतराने तपासून फुटेजमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळून आल्यास त्यावर योग्य कार्यवाही करण्याची जबाबदारी विशेषत्वाने मुख्याध्यापकांची आणि सर्वसाधारणपणे शाळा व्यवस्थापन समितीची असताना असा शासनाचा आदेश असताना शाळेची कमिटी या आदेशाला केराची टोपली दाखवित असल्याने अश्या शाळेची मान्यता रद्द होणे गरजेचे आहे . कंत्राटी पद्धतीने केल्या जाणाऱ्या नेमणुकांबाबत काटेकोर तपासणी होणे आवश्यक आहे. महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती करणे गरजेचे आहे.
सखी सावित्री समिती , विद्यार्थी सुरक्षा समितीचे गठन , अनुचित प्रकार दडवण्याचा प्रकार होणे , ही देखील विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा जीवघेणा प्रकार आहे . स्कुलबस समिती असणे काळाची गरज आहे . बस मध्ये विदयार्थ्यांची क्षमतेपेक्षा जास्त वाहतुक सध्या अश्या बस मध्ये होत असते . मात्र अशा गोष्टींकडे आर टी ओ जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असतात.
अशा सर्व उपाययोजना व आदेश शासनाने वेळोवेळी केलेल्या असताना त्याची अंमलबजावणी शाळांकडून होत नाही. त्यामुळेच अशा घटना वारंवार घडत आहेत. यासाठी कर्जतमध्ये घडलेल्या घटनेची दखल घेऊन संपूर्ण रायगड जिल्हयातील सर्व शाळांची तपासणी करून शासनांचे आदेशाचे पालन त्यांचे कडुन होते की नाही ? याची शहानिशा करून ज्या शाळा शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवतात अशा शाळांची मान्यता त्वरीत रदद करावी , अशी मागणी ऍड. कैलास मोरे यांनी केली असून , याकडे गांभीर्याने न बघितल्यास भविष्यात आपल्याला दोषी धरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा संतप्त इशारा मा.शिक्षण मंञी , महाराष्ट्र राज्य व मा. जिल्हाधिकारी अलिबाग – रायगड यांना दिला आहे .