Tuesday, June 3, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" कर्जत मतदार संघात अनेक राजकीय पक्षांना घरघर "..

” कर्जत मतदार संघात अनेक राजकीय पक्षांना घरघर “..

कार्यसम्राट आमदार ” महेंद्र शेठ थोरवे ” यांची किमया !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत – खालापूर मतदार संघाची सन २०२४ ची निवडणूक खूपच वादळी ठरली . या निवडणुकीत कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांचा पुन्हा एकदा ” रोमहर्षक विजय ” झाला असून त्यांना पराभूत करण्यासाठी लागलेली पडद्याआडची रायगडातील ती बलाढ्य शक्ती यानिमित्ताने ” धोबी पछाड ” झाल्याचे चित्र या निवडणुकीत दिसून आले . मात्र या ” हार – जीत ” च्या लढाईत या मतदार संघातील अनेक पक्षांच्या अस्तित्वाला ” घरघर ” लागली असून काही नेत्यांचे व त्यांच्या पक्षांचे देखील ” नामोहरम ” झाल्याचे दिसून येत आहे . हि सर्व किमया ” कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे ” यांचीच असल्याचे दिसून येत आहे.

या मतदार संघात शिवसेना पक्षाची खूप मोठी ताकद असताना खंडित झालेल्या शिवसेनेत पुन्हा एकदा जीव ओतून आमदार महेंद्र शेठ थोरवे निवडून आल्याने हा पक्ष १ नंबरचा ठरला आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते तथा राजिप चे माजी उपाध्यक्ष सुधाकर भाऊ घारे यांनी या निवडणुकीत बंड करून महायुतीला न जुमानता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे त्यांनी व त्यांचे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांनी राजीनामे देऊन अपक्ष उमेदवारी लढवली होती . मात्र त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला . त्यांच्या राजीनामा दिल्याने कर्जत खालापूर मतदार संघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घ्यायला सुद्धा कार्यकर्ता शिल्लक राहिला नव्हता . या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाची देखील खूप हानी झाली . या निवडणुकीत मनसे ने परिवर्तन आघाडीचे अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना जाहीर पाठिंबा दिला होता . मात्र यावेळी मनसे कर्जत तालुका अध्यक्ष सहित अनेक जिल्हा पदाधिकारी , मनसे महिला आघाडी पदाधिकारी यांनी पक्ष सोडून गेल्याने मनसे पक्षाची देखील येथील घडी विस्कटल्याची व पक्षाला घरघर लागल्याचे चित्र आजही पहाण्यास मिळत आहे.

या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाची तर खूपच ” वाताहात ” झाली आहे . शेकाप हा महाआघाडीतील मित्र पक्ष असताना रायगडात ते स्वतंत्र उभे राहिले होते , तर कर्जत मतदार संघात कुठलाच उमेदवार न दिल्याने एक गटाचा छुपा पाठिंबा शिवसेनेला , दुसऱ्या गटाचा खुला पाठिंबा अपक्ष उमेदवार सुधाकर भाऊ घारे यांना होता . तर काही शेकाप शिवसेना ( उबाठा ) गटाकडे असल्याने शेकापची सर्वच बाजूने ” रक्तरंजित लक्तरे ” ओढण्यात आली . झालेल्या परिस्थितीत हार पत्करावी लागल्याने आता राजिप चे माजी समाज कल्याण सभापती नारायण डामसे हे शेकापमधून फुटीच्या मार्गावरून ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले आहेत . त्यामुळे शेकाप चे अस्तित्व डळमळीत झाले असून याचा खूप मोठा फटका जयंत पाटील यांना बसणार आहे . होणाऱ्या हानी मुळे शेकाप या मतदार संघात ” काय होतास तू….काय झालास तू ” , अशी कुत्सितपणे येथे चर्चा होत असताना दिसत आहे . याच बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष , राष्ट्रीय काँग्रेस पक्ष , बहुजन समाज पार्टी , या पक्षाची देखील घसरण या मतदार संघात मोठ्या प्रमाणात झालेल्या निवडणुकीत पहाण्यास मिळाली . आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येऊन ठेपल्या असताना या घरघर लागलेल्या पक्षांत ” नीरव शांतता ” पहाण्यास मिळत आहे.

आता परिवर्तन आघाडीचे नेते सुधाकर भाऊ घारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांचे राजीनामे नामंजूर केल्याने पुन्हा कार्यरत होणार आहेत , ते होणारच होत , मात्र झालेल्या विलंबात काय दडलेले आहे , याची चर्चा मात्र सर्वत्र होताना दिसत आहे .
- Advertisment -

You cannot copy content of this page