if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) स्थानिक स्वराज्य संस्था व लोकसभेच्या निवडणुका अजून पार पडलेल्या नसताना महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या अद्यापी जागा वाटपाचा कार्यक्रम अजून झालेला नसताना कल्पो कल्पित संभ्रम निर्माण करणाऱ्या बातम्या पसरविणे चुकीचे असून कर्जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंघ असून या मतदार संघातील जागा अजून निश्चितच झाली नाही , असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस , कोकणचे भाग्य विधाते तथा रायगडचे खासदार सुनीलजी तटकरे यांनी कर्जत तालुक्यातील खांडपे – रेडीसन ब्लू येथे विद्यार्थी गुणगौरव सोहळा राजिप चे माजी उपाध्यक्ष सुधाकर शेठ घारे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुका पदाधिकारी यांच्या देखरेखी खाली आयोजित केला होता , त्यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित कार्यकर्ते यांच्या समोर आपले मत व्यक्त केले.
त्यांच्या या मतामुळे येथे राजकीय स्फोट झाला असून विधानसभेचा नक्की उमेदवार कोण ? हे अजून गुलदस्त्यातच राहिले आहे . त्यातच खासदार सुनील तटकरे यांचे राजकीय मित्र माजी आमदार सुरेश भाऊ लाड या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने ” ये दोस्ती इमतिहान लेती है ” असाच सूर या कार्यक्रमात उमटला होता.
यावेळी व्यासपीठावर राजिपचे माजी उपाध्यक्ष तथा शिक्षण – आरोग्य – क्रिडा सभापती सुधाकर शेठ घारे , राजिप चे माजी अध्यक्ष सुरेश दादा टोकरे , कर्जत ता. अध्यक्ष भगवान चंचे , महिला अध्यक्षा ऍड.रंजना धुळे , जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोपतराव , माजी सभापती एकनाथ दादा धुळे , खांडपे ग्रामपंचायत माजी सरपंच परशुराम ( आप्पा ) घारे , माजी उपसरपंच मधुकर घारे , त्याचप्रमाणे तालुक्यातील अनेक पदाधिकारी , कार्यकर्ते , महिलावर्ग उपस्थित होते.
खासदार सुनील जी तटकरे यांच्या शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून १० वी आणि १२ वी शालांत परीक्षेमध्ये शाळेमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा तसेच शंभर टक्के निकाल लागलेल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना खासदार सुनील तटकरे व मान्यवरांच्या हस्ते शाल , सन्मानपत्र ,पुष्पगुच्छ , व आकर्षक भेट वस्तू देवून सर्वाँना सन्मानित करण्यात आले .यावेळी रेडीसन ब्लू हॉटेलचा सभागृह कार्यकर्त्यांनी काठोकाठ भरला होता.
यावेळी त्यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करताना म्हणाले की , पंचतारांकित हॉटेलमध्ये गुणगौरव कार्यक्रम घेवून सुधाकर घारे यांनी दिमाखदार सोहळा घेतल्याने त्यांचे कौतुक केले . माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत उतिर्ण होणे गरजेचे असून विद्यार्थी दडपणाखाली असताना देखील चांगले मार्क काढणे कौतुकास्पद असल्याचे गौरवद्गार त्यांनी काढले .यावेळी देखील कोकणातील मुलींनी बाजी मारली आहे , वैज्ञानिक क्षेत्रात कर्जत तालुक्यातील जैन हिने गरुड भरारी घेतल्याने तिचे विशेष अभिनंदन केले .मुख्याध्यापकांनी देखील सर्व पाल्यांना आपलीच मुले समजून केलेले परिश्रम श्रेष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले . गुणवत्ता असते तिथे संधी मिळतेच , म्हणूनच भविष्यात एम पी एस सी , यू पी एस सी परीक्षेत उतिर्ण होवून महाराष्ट्रात झेप घ्या , असा आशीर्वाद देखील याप्रसंगी सर्वाँना दिला.
गतिमान सरकार असल्याचे भासवून करोडो रुपयांच्या जाहिरात बाजी करून नागरिकांची दिशाभूल करण्याचे काम हे सरकार करत असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सुमारे जाण्याचे धाडस राज्य सरकार मध्ये नाही , मतदारांच्या मनात चीड निर्माण झाली असून भविष्यात निवडणुकीत त्याचे चित्र सर्वांना बघायला मिळेल , असा घणाघाती टोला देखील त्यांनी शिंदे सरकारला लगावला.