Tuesday, September 17, 2024
Homeपुणेमावळतुंग दुर्ग कड्याचा सुटलेला तुकडा धोकादायक असून शासनाने लक्ष देण्याची मागणी…

तुंग दुर्ग कड्याचा सुटलेला तुकडा धोकादायक असून शासनाने लक्ष देण्याची मागणी…

लोणावळा (प्रतिनिधी):मावळ तालुक्यातील तुंग दुर्ग येथील तुंगी गावच्या बाजूचा कड्याचा मोठा हिस्सा सुटलेला असून तो कधीही कोसळू शकतो त्यासाठी शासनाने अगोदरच उपाययोजना करावी अशी स्थानिकांची मागणी होत आहे.
नुकतीच रायगड मधील इरशालगड खालापूर येथील भुसंखलनामुळे अनेक आदिवासी बांधवांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असून त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.तसेच अनेक डोंगरभागाखाली गाव वस्तीत भीती निर्माण झाली आहे.
इरशालगडसारखी दुर्घटना मावळ तालुक्यातील तुंग दुर्ग येथे घडू नये यासाठी शासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी मागणी तुंगी ग्रामस्थ व वन्यजीव रक्षक संस्थेकडून करण्यात येत आहे.
तरी पुणे आपत्ती व्यवस्थापनाने याची दखल घेऊन शहानिशा करुन संबंधीत धोकादायक ठीकाणी राहत असलेल्या नागरीकांना तसे सुचीत करावे.
- Advertisment -

You cannot copy content of this page