Friday, June 20, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडभाजपाचे कार्यसम्राट " आमदार प्रशांत ठाकूर " मंत्री पदापासून वंचित !

भाजपाचे कार्यसम्राट ” आमदार प्रशांत ठाकूर ” मंत्री पदापासून वंचित !

” मेरा नंबर कब आयेगा “

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या व उदयास येणाऱ्या तिसऱ्या मुंबईच्या पनवेल या विधानसभा मतदार संघातून ” कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर ” हे तब्बल ” ४ ” वेळा आमदार झाले आहेत . अनेक ” विकास प्रकल्प ” आणून पनवेलचा चेहरा मोहरा बदलणाऱ्या या दूरदृष्टी असलेल्या नेत्याला राज्यात भाजपाचे सरकार २ वेळा येवून देखील अद्याप पर्यंत मंत्री पदाची संधी मिळाली नसल्याने ” मेरा नंबर कब आयेगा ” अशीच म्हणण्याची वेळ आमदार प्रशांत ठाकूर यांच्यावर आली आहे.


एकेकाळी शेतकरी कामगार पक्षाची एकहाती सत्ता पनवेल विधानसभा मतदार संघात ” रामशेठ ठाकूर व प्रशांत ठाकूर ” या पिता – पुत्रामुळे होती . शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर रामशेठ ठाकूर खासदार म्हणून देखील निवडून आले होते , मात्र नंतर त्यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये पक्ष प्रवेश केला , तेंव्हा प्रशांत ठाकूर हे आमदार झाले . काँग्रेस मध्ये देखील काही काळ गेल्यावर अनेक समस्यांवर काँग्रेसी नेते उपाय योजना करत नसल्याने त्यांनी भारतीय जनता पक्षात पक्ष प्रवेश केला , व आजतागायत पनवेल मधून ४ वेळा निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केला आहे . या आमदारकीच्या काळात त्यांनी राज्यातील व केंद्रातील भरघोस ” विकास निधी ” आणून अनेक प्रकल्प उभारून , दूरदृष्टी ठेवून ” आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या ” माध्यमातून ” अविस्मरणीय ” विकास करून पनवेलचे ” रूप ” पालटले आहे . तिसऱ्या मुंबईचे प्रवेशद्वार म्हणून ओळखले जाणारे पनवेल व आमदार प्रशांत ठाकूर अशी ओळख त्यांनी राज्यात केली आहे.


अतिशय दूरदृष्टी असलेले विकास पुरुष , प्रशासकीय – राजकीय – सामाजिक – शैक्षणिक – धार्मिक व सांस्कृतिक क्षेत्राचा गाडा अभ्यास असलेले हे नेतृत्व उत्कृष्ट ” संघटन कौशल्य ” असलेले आहे . काही काळातच त्यांच्या जिल्हाध्यक्षाच्या कार्यकाळात त्यांनी भाजप पक्ष जिल्ह्यात फोफावून आज भाजपाचे ३ आमदार रायगडात आहेत.


एकेकाळी भारतीय जनता पक्षाचे नेते ” स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी ” यांचे सरकार १ मताने पाडणारे खासदार रामशेठ ठाकूर यांचे पुत्र आमदार प्रशांत ठाकूर हे असल्याने पनवेल मतदार संघातून आजपर्यंत ४ वेळा निवडून येऊन आमदार झालेले असताना देखील राज्यात मुख्यमंत्री असलेल्या भाजप नेतृत्वाने त्यांना मंत्रिपद दिले नाही की काय ? असा संशयास्पद प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत असून , कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना आता ” मेरा नंबर कब आयेगा ” , अशीच म्हणण्याची वेळ आली असल्याचे चित्र व चर्चा येथे पहाण्यास ऐकण्यास मिळत आहे .

- Advertisment -

You cannot copy content of this page