Thursday, June 19, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड" मराठी माणसांचा हक्काचा आवाज….मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे "

” मराठी माणसांचा हक्काचा आवाज….मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे “

” सत्तेत ” नाही पण लोकांच्या ” हृदयावर ” अधिराज्य !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) गेली ” ४० दशके ” मराठी माणसांच्या ” हृदयावर ” अधिराज्य करणारा एकमेव नेता म्हणजे मराठी हृदय सम्राट ” महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ” . ते राज्याच्या सत्तेत जरी नसले तरी मराठी माणसांचा ” हक्काचा आवाज ” म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते . ” स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे ” यांच्या संघर्षमय राजकीय कारकिर्दीत बरोबर राहून त्यांच्या ” मुशीत वाढलेले – घडलेले ” हे प्रगल्भ नेतृत्व . मराठी माणसांवर अन्याय अत्याचार विरोधात नेहमीच पहिला ” एल्गार ” हा मनसे प्रमुख राज साहेब ठाकरे यांचा असतो . आपल्या राजकीय कार्यकिर्दीची पर्वा न करता त्यांनी घेतलेले निर्णय जरी पक्षाला घातक असले तरी त्यांनी त्याची कधीच पर्वा केलेली नाही , म्हणूनच आज जरी ते सत्तेच्या उंबरठ्यावर नसतील तरी त्यांना मानणारा वर्ग हा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पहाण्यास मिळतो , हीच त्यांची खरी ” ताकद ” सर्वत्र आहे.


महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यात कुठेही सभा असली तर सर्वाधिक गर्दी खेचणारा हा नेता देशात ” अव्वल ” आहे . त्याकाळी शिवसेनेची ताकद असलेले राजसाहेब विभक्त झाल्यावर मराठी माणसाची ताकद विखुरली गेली , मात्र त्याही परिस्थितीत ” महाराष्ट्र नव निर्माण सेना ” पक्ष स्थापन करून त्यांनी आपले स्वतंत्र अस्तित्व तयार केले . पक्ष स्थापनेनंतर झालेल्या निवडणुकीत तब्बल ११ आमदार त्यांनी राज्यातून निवडून आणले . देशातील – राज्यातील अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्यांची आजची भूमिका नेहमीच ” एकला चलो ” ची असल्याने आज जरी त्यांना राजकीय यश मिळत नसले तरी मात्र मराठी माणसाला जिवंत ठेवण्याचे ” सामर्थ्य ” महाराष्ट्र नव निर्माण सेनेत आहे , हे ते ठणकावून सांगतात . मनसेत असताना ” हुकमी एक्का ” सारखे फिरणारे त्यांचे पदाधिकारी त्यांना सोडून दुसऱ्या पक्षात गेल्यावर त्यांची न राहणारी किंमत ” अडगळीत ” पडल्या सारखीच होते .


मराठी भाषा जिवंत रहावी , मराठी पाट्या , मराठी माणसाला नोकरीला प्राधान्य , रोजगार , न्याय , अन्याय – अत्याचार , मराठी माणसाच्या विरोधात घेतलेले निर्णय , परप्रांतीय लोंढे , देशाच्या – राज्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांचे भाष्य , त्यांचे निर्णय , यासाठी ते करत असलेले संघर्ष एक ना एक दिवस राज्याच्या सत्तेच्या दिशेने नेतीलच.

छत्रपतींच्या या रायगडात ” जिल्हाध्यक्ष जितेंद्र दादा पाटील ” यांच्या नेतृत्वाखाली मनसे ची सुरू असलेली घोडदौड कर्जत तालुक्यात अध्यक्ष ” यशवंत भवारे ” व कर्जत शहरात ” शहराध्यक्ष राजेश साळुंखे ” व अनेक मनसे सैनिकांच्या साथीने कर्जत तालुक्यात व महाराष्ट्रात त्यांची सत्ता असेल , व या अभेद्य नेत्याचे राजकीय स्वप्न पूर्ण होईल , अशीच सदिच्छा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ” मराठी हृदय सम्राट महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ” यांना देणे योग्य होय .

- Advertisment -

You cannot copy content of this page