Sunday, June 1, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडविधानसभेच्या निवडणुकीनंतर कर्जत मतदार संघात शिवसेनेची " कासव " गती !

विधानसभेच्या निवडणुकीनंतर कर्जत मतदार संघात शिवसेनेची ” कासव ” गती !

” शिवसेना ठाकरे गटात निरव शांतता “

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत खालापूर मतदार संघात विधानसभेच्या निवडणुकीत ” पराभव ” झाल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात काहीच हालचाल दिसत नसून पक्षाचे आंदोलनात्मक पवित्रा , बैठक , येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जिल्हा परिषद , पंचायत समिती , ग्रामपंचायत व नगर परिषदेच्या निवडणुका संदर्भात कुठलेच नियोजन बद्ध कार्यक्रम दिसून येत नसून या निमित्ताने पक्षाच्या संपर्क कार्यालयात देखील ” नीरव शांतता ” पहाण्यास मिळत आह.


कर्जत मतदार संघात शिवसेना ठाकरे गटाचे व महा आघाडीचे उमेदवार म्हणून नितीन दादा सावंत यांनी निकरीची लढत दिली , मात्र निवडणुकीच्या काळात अनेक पदाधिकारी फुटल्याने शिवसेना ठाकरे गटाला विजयाचा ” पल्ला ” पार करता आला नाही . त्यामुळे पराभव झाल्याने २३ नोव्हेंबर २०२४ नंतर गेल्या सहा महिन्यात शिवसेना ठाकरे गटाची कुठेच हालचाल दिसली नाही . आता तर ४ महिन्यानंतर ” स्थानिक स्वराज्य संस्थेच्या ” सर्व निवडणुका येऊन ठेपल्या असताना पक्षाची व्यूह रचना , बैठका , नागरिकांच्या स्थानिक प्रश्नाबाबत मोर्चे , आंदोलने , निवेदने , शिबिर असे आंदोलनात्मक व सामाजिक कामाचे चित्र कुठेच दिसत नसल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांत देखील ” मरगळ ” दिसून येत आहे . याबाबतीत उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत , तालुका प्रमुख उत्तम दादा कोळंबे , कर्जत शहर प्रमुख निलेश घरत व इतर पदाधिकारी ” मौन ” बाळगून असून पक्षात उत्तेजनार्थ कार्यक्रम दिसून येत नाही . त्यामुळे असे शांततापूर्ण वातावरण पक्षाला ” घातक ” असल्याचे दिसून येत आहे.


शिवसेना ठाकरे गटाच्या अश्या ” कोमात ” असलेल्या वातावरणामुळे येणाऱ्या निवडणुकीत याचा परिणाम होऊन मतांत फरक पडण्याचे चित्र असून कार्यकर्ते देखील ” संभ्रावस्थेत ” दिसून येत आहेत . कर्जत शहरात पाणी , कचरा , स्वच्छता , वीज , वाहतूक , व पार्किंग समस्या , रस्ते , तसेच इतर दैनंदिन समस्या भेडसावत असताना या मतदार संघात प्रमुख विरोधी पक्ष असलेला तर कर्जत न. प . वर ” नगराध्यक्ष ” पद सांभाळलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची काहीच भूमिका नसणे , हे येणाऱ्या निवडणुकीत पक्षास ” घातक ” परिस्थिती असून उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी कर्जतकर नागरिकांच्या हितासाठी यावेळी योग्य पाऊले उचलणे गरजेचे आहे , पक्षाची हि ” कासव गती ” येणाऱ्या निवडणुकीत हानिकारक असल्याची चर्चा सध्या या मतदार संघात होत आहे . शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कुठे कमी पडत आहे का ? हे यानिमित्ताने ” आत्मचिंतन ” करण्याची गरज येवून ठेपली आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page