रायगड (प्रतिनिधी):नगराज शेठ सी.बी.सी. बोर्ड इंटरनॅशनल स्कूल बोरी, उरण येथे डॉ जयपाल पाटील यांचा 499 वा आपत्ती व्यवस्थापनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
यामध्ये शाळेतील 40 विद्यार्थी व पालक उपस्थित होते. त्यामध्ये शाळेच्या दोन्ही विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती आशिका व ज्योती पाटील,शाळेचे व्यवस्थापक प्रदीप पाटील उपस्थित होते.
आपत्ती व्यवस्थापन तज्ञ जयपाल पाटील यांचा 499 वा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये मुलांना रस्ता ओलांडताना घेण्याची काळजी,आपल्या खिशात आणि दप्तरात कायम आई आणि वडिलांच्या मोबाईल क्रमांकाची चिठ्ठी ठेवणे,अनोळखी माणसाकडून चॉकलेट अगर खाऊ घेऊ नये,घरातील विजेच्या बटनाशी खेळू नये, अनोळखी माणसा बरोबर मोटरसायकल अथवा गाडीने जाऊ नये,घरात आई-वडील नसताना अनोळखी माणसाला दरवाजा उघडू नये, रस्त्यावरील खाऊ खाण्याचा आग्रह धरू नये ,आईने घरी केलेलाच खाऊ खावा,घराशेजारील रिकाम्या जागेत एक झाड लावून त्याला वाढवावे अशा विविध सूचना या छोट्या मुलांना व त्यांच्या पालकांना देण्यात आल्या.
तसेच जयपाल पाटील यांच्याकडून विध्यार्थ्यांना खाऊ म्हणून लाडू ही प्रसिद्ध कविता ऐकवून दाखविली.यावेळी विध्यार्थी व पालकांचा उत्साह पारणें फेडणारा होता.