![]()
if(isset($image4)); {?>
![]()
} ?>
if(isset($image5)); {?>
![]()
} ?>
कर्जत-खालापूर विधानसभा समन्वयक पदी रामदास घरत यांची नियुक्ती..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) शेतीच्या कामाने राकट झालेल्या हाताला अधिकार मिळवून देण्यासाठी या देशातील स्थानिक स्वराज्य संस्थेबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका लढून शेतकरी – दलीत – आदिवासी – ओबीसी – शोषित – वंचित – पीडित – अल्पसंख्याक – विद्यार्थी – युवक – महिला या सर्वांना न्याय – अधिकार मिळवून देवून राज्यात शेतकरी हिताचे राज्य करून शेतकऱ्यांचे भाग्यविधाते तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री व भारत राष्ट्र समिती या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ” मा. के चंद्रशेखर राव ” यांची महाराष्ट्राच्या राजकारणात ” दमदार एन्ट्री ” झाली असून रायगडातील सर्व तालुक्यात सदस्य बनवून येणाऱ्या सर्व निवडणुका ताकदीने लढवून महाराष्ट्रात तेलंगणा राज्यात जे उपक्रम राबविले जात आहेत तेच उपक्रम महाराष्ट्रात राबवून सर्व समावेशक समाज सत्ताधारी बनविण्याच्या हेतूने के चंद्रशेखर राव यांची व्यूहरचना राबविली गेली तर येथील प्रस्थापित पक्षाना हादरा दिल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही , जनताच आमची पॉवर आहे , असे सडेतोड बोल भारत राष्ट्र समितीचे कोकण समन्वयक प्रा. विजय मोहिते यांनी कर्जतमध्ये आयोजित केलेल्या पक्षाच्या ” दमदार एन्ट्री ” चे पत्रकार परिषद घेवून पक्षाची ध्येय धोरणे मांडली.
यावेळी त्यांनी रायगड जिल्हा समन्वयक महेश खडे व कर्जत – खालापूर विधानसभा समन्वयक म्हणून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) या पक्षाचे उपतालुका प्रमुख असलेले व आता भारत राष्ट्र समितीत आलेले रामदास घरत यांची नियुक्ती या पत्रकार परिषदेत केली.
आज कर्जतमध्ये रॉयल गार्डनच्या सभागृहात भारत राष्ट्र समिती या पक्षाची पत्रकार परिषद घेण्यात आली , यावेळी पक्षाची पुढील व्यूह रचना , ध्येय धोरणे , पद नियुक्ती या हेतूने बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.सदर पत्रकार परिषदेत प्रा. विजय मोहिते – कोकण समन्वयक , महेश खडे – रायगड जिल्हा समन्वयक , रामदास घरत – कर्जत – खालापूर विधानसभा समन्वयक , मिलिंद सुर्वे – ज्येष्ठ कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यावेळी प्रा . विजय मोहिते पुढे म्हणाले की , तेलंगणा मुख्यमंत्री ” मा. के चंद्रशेखर राव ” यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाची ध्येय धोरण , राज्याची सुधारित स्थिती उल्लेखनीय आहे . या राज्यात गोदावरी , कृष्णा या दोनच नद्या आहेत ,या दोन नद्यांवर त्यांनी करिश्मा करून तेलंगणा राज्य सदृढ करून शेतकरी बांधवांना राजा केले आहे.
महाराष्ट्रात ८ नद्या व उपनद्या आहेत , तरी येथील परिस्थिती पाण्याच्या बाबतीत बिकट आहे ,मात्र तेलंगणा राज्यात सिंचन पद्धत अवलंबली , धडाडीचे निर्णय घेतले , सर्वसामान्यासाठी केलेली कार्य , उल्लेखनीय आहेत . तेथे २०१४ पर्यंत पाणी टंचाई होती , मात्र के चंद्रशेखर राव मुख्यमंत्री झाल्यावर केलेले प्रोजेक्ट उल्लेखनीय आहेत , ९५ टक्के जमीन ओलिताखाली , सिंचनाखाली आणली , जे प्रयोग केले त्यावर वीज निर्मिती करण्यात आली , म्हणूनच आज तेलंगणात २४ तास पाणी आणि २४ तास वीज विनाशुल्क देण्यात आली , कालेश्र्वरंम व भगीरथ ये दोन प्रोजेक्ट तयार केले , येथील शेतकरी बांधवांना १ एकर शेतीला १० हजार रुपये बी बियाणे साठी ” प्रोत्साहन भत्ता ” देण्यात आला , म्हणून सावकारी कर्जाचे प्रमाण कमी झाले , रयतू प्रोजेक्ट शेतकरी वर्गाला तयार केले , शहरात मोठमोठे मॉल तयार केले , शेतीला बाजार भाव योग्य मिळत आहे , राज्यात ४३४ योजना तयार केल्या आहेत , महिलांना देखील प्रसूती काळात सरकार कडून संपूर्ण खर्च करून पुढील पिढी सक्षम करण्यात आली.
आरोग्याचे सर्व प्रश्न मार्गी लावले आहे , लग्नासाठी १ लाख १६ हजार देण्यात येतात , हे पैसे पत्रिका दाखवा आणि घेवून जा , अशी योजना आणली , बहुजन वर्गाला योग्य न्याय दिला , १२५ फुटी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा ब्रांझ चां पुतळा बसविला आहे ,आज कर्जत – खालापूर विधानसभेत २५०० हजार सभासद झाले आहेत , या कार्यकर्त्यांचा २ लाख रुपयांचा पक्षाकडून lic विमा काढला जाणार आहे , आम्ही नागरिकांच्या पोटाच्या प्रश्नावर बोलतो , त्यांच्या न्याय हक्कासाठी बोलतो , असा हा भारत राष्ट्र समिती हा पक्ष असल्याचे प्रा. विजय मोहिते यांनी प्रकाश टाकला . आम्ही येथील परिस्थिती याचे मॉडेल दाखवणार व महाराष्ट्राची सत्ता हस्तगत करू , आज भारत राष्ट्र समितीची २८८ मतदार संघात प्रचार प्रसार होत आहे , स्थानिक प्रश्न घेवून आम्ही रस्त्यावर उतरणार , आज१८ आमदार , ४ खासदार यांनी पक्ष प्रवेश केला आहे , रायगडाचे ३ माजी आमदार आमच्या संपर्कात आहेत , असा गौप्यस्फोट देखील त्यांनी केला.
येथील दलीत – कष्टकरी वर्ग योजना राबवून आम्ही १० लाख रु धंद्यासाठी मदत देण्यात येणार , तर शिक्षण मोफत देणार , आमची ” जनता हिच पॉवर” असल्याचे त्यांनी सांगितले .तर शिवसेना ठाकरे गटातून भारत राष्ट्र समितीत पक्ष प्रवेश करणारे रामदास घरत यांनी , या पक्षात वेगळी ध्येय धोरणे आहेत , मी स्वतः मुख्यमंत्री याना भेटलो , येथील स्थानिक पक्षावर सर्व नाराज आहेत , नागरिकांच्या प्रश्नावर आम्ही आवाज उठवू , आणि सर्वाँना न्याय देवू , म्हणून सर्व शेतकरी – बहुजन वर्ग – मुस्लिम बांधवांनी या ” भारत राष्ट्र समिती ” पक्षात प्रवेश करून ” अब की बार – किसान सरकार ” या ध्येयवादी पक्षाला व तेलंगणा मुख्यमंत्री मा. के चंद्रशेखर राव , यांचे हात मजबूत करा , असे आवाहन त्यांनी केले.