Saturday, June 21, 2025
Homeमहाराष्ट्ररायगडभारतीय सैनिकांच्या " शौर्याच्या " स्मरणार्थ आर पी आय पक्षातर्फे कर्जतमध्ये "...

भारतीय सैनिकांच्या ” शौर्याच्या ” स्मरणार्थ आर पी आय पक्षातर्फे कर्जतमध्ये ” भारत जिंदाबाद यात्रा ” संपन्न !

कर्जत तालुका अध्यक्ष ” हिरामण भाई गायकवाड ” यांचा पुढाकार…

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे २२ एप्रिल २०२५ रोजी २८ निष्पाप भारतीयांना पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेकांचे ” सिन्दुर ” मृत्युमुखी पडले होते . याचा मुहतोड जवाब मोदींजीनी ” ऑपरेशन सिन्दुर ” राबवून देण्यात आल्याने भारत देश कधीही घाबरणारा नाही , असे पाकिस्तानला दाखवून देऊन अभिमानास्पद कामगिरी केली . ” ऑपरेशन सिन्दुर ” तो सिर्फ झाकी है , पुन्हा आमच्या वाटेला गेलात तर यापुढे ” कोंबिन ऑपरेशन ” करून दहशतवाद्यांना घरात घुसून मारू , अशी संतप्त प्रतिक्रिया संपूर्ण भारत देशात उमटली होती . या ” ऑपरेशन सिंदूर ” म्हणजे रक्ताच्या सांडलेल्या प्रत्येक थेंबाचा आणि पुसलेल्या कुंकवाचा ” बदला ” होता . मात्र यामध्ये भारतीय जवान देखील शहीद झाले . म्हणूनच भारतीय सैनिकांच्या शौर्याच्या स्मरणार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री मा. रामदासजी आठवले साहेब यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यात ” भारत जिंदाबाद यात्रेचे ” आयोजन करण्यात आले असताना आज बुधवार दिनांक ०४ जून २०२५ रोजी आर पी आय पक्षातर्फे कर्जतमध्ये कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड यांच्या पुढाकाराने व त्यांच्या नेतृत्वाखाली ” भारत जिंदाबाद यात्रेचे ” आयोजन किरवली ते चार फाटा येथे रॅली काढून करण्यात आले होते.


पहलगाम येथे झालेल्या दुर्दैवी हल्ल्यानंतर पूर्ण देशभरात पाकिस्तान व त्याच्या नापाक दहशतवादा विषयी संतापाची लाट उसळली होती . भारताचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी पाकिस्तानला ” करारा जवाब ” देत ” ऑपरेशन सिंदूर ” च्या माध्यमातून उत्तर देत २८ मायभगिनींचे ” कुंकू ” पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून भारतीय सैन्याने बदला घेतला , असे मत आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामण भाई गायकवाड व्यक्त करत यांत आपले भारतीय सैनिक देखील शहीद झाले त्या भारतीय सैन्याच्या ” धैर्य व शौर्याला ” त्यांनी भारत जिंदाबाद यात्रे ” निमित्ताने ” सलाम ” करत शहीद झालेल्या भारतीय जवानांना ” अभिवादन ” केले . यावेळी महिला कर्जत तालुका अध्यक्ष अलका सोनवणे व विजय गायकवाड यांनी देखील उपस्थितांना मार्गदर्शन केले.


या ” भारत जिंदाबाद यात्रेत ” काढलेल्या रॅलीत आर पी आय कर्जत तालुका अध्यक्ष हिरामणभाई गायकवाड , जीवन गायकवाड – युवा कोकण सचिव , अलका सोनवणे – महिला तालुका अध्यक्ष , किशोर गायकवाड – ता. संपर्कप्रमुख , विजय गायकवाड – प्रसिद्धी प्रमुख , अशोक गायकवाड – तालुका सचिव , जगदीश शिंदे – उपाध्यक्ष कर्जत तालुका , विकास गायकवाड – खजिनदार , सतीश रिकीबे – तालुका संघटक , निलेश गायकवाड – पंचायत समिती अध्यक्ष , नितीन सोनवणे – वेणगाव पंचायत समिती अध्यक्ष , अमर गायकवाड – उमरोली जिल्हा परिषद वॉर्ड अध्यक्ष , अमर जाधव – सावेले पंचायत समिती अध्यक्ष , उमेश भालेराव – उमरोली पंचायत समिती वॉर्ड उपाध्यक्ष , हरिश्चंद्र सदावर्ते – नेरळ कार्याध्यक्ष , ज्येष्ठ नेत्या वर्षा चिकणे , मनिषा जाधव – नेरळ महिला शहर अध्यक्ष , सुनीता चव्हाण – महिला शहर कार्याध्यक्ष , कुंदा भोर – नेरळ शहर संघटक , झरीना शेख , नेहा गायकवाड – उप शहर अध्यक्ष , भारत रोकडे , सुखदेव भालेराव , प्रमोद लवांडे , देवराम गायकवाड , राजेश गायकवाड , मोहन रोकडे , दिनू रोकडे , दीपक ठाकरे , योगिनी गायकवाड , मंजुळा गायकवाड , शारदा भालेराव , ज्योती रोकडे , कविता गायकवाड , शुभांगी भालेराव , निशा लवंडे , संगीता कनोजे , अस्मिता गायकवाड , रेखा जाधव , राधिका गायकवाड , कांचन भालेराव , रेखा गायकवाड , कमल भालेराव , निर्मला रोकडे , अनुजा रोकडे , शीतल रोकडे , महेंद्र भालेराव ,बाबुलाल कानोजिये , त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कर्जत तालुक्यातील आर पी आय कार्यकर्ते , महिला वर्ग उपस्थित होते .

- Advertisment -

You cannot copy content of this page