Friday, June 20, 2025
Homeमहाराष्ट्ररायगड"अक्कल शून्य कर्जत वीज कंपनीचे मतिमंद केंद्रे "…

“अक्कल शून्य कर्जत वीज कंपनीचे मतिमंद केंद्रे “…

महिलांच्या ” वटपौर्णिमा ” सणालाच वीज कंपनीची बत्ती गुल , वीज कंपनीवर ” महिलांचा ” संताप….

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) बारा महिने आला दिवस सारखा समजणाऱ्या व आपल्या दुकानातील माल ग्राहकांना वेळेवर व पुरेसे देता येत नसल्याने वीज कंपनीच्या कर्जत कार्यालयावर नेहमीच नागरिकांचा ” संताप ” असतो . आता तर ऐन सणासुदीला विज कंपनीची ” बत्ती गुल ” होत असल्याने महिलांचा देखील संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे . यावेळी तर महिलांचा व विशेष करून लग्न होऊन आलेल्या सवाशिनींचा तर माहेरवासियांसाठी विशेष सण असलेल्या तसेच पावसाळ्यानंतर पहिलाच उत्सव असलेल्या ” वट पौर्णिमेच्या ” दिवशीच सकाळ पासून वीज नसल्याने महिला वर्गाचा वीज कंपनीचे उपकार्यकारी अभियंता ” केंद्रे ” यांच्यावर संताप खदखदत आहे.


आज मंगळवार दिनांक १० जून २०२५ रोजी ” वटपौर्णिमा ” हा महिलांचा पवित्र सण हिंदू धर्मात मानला जातो . आदल्या दिवसापासूनच या सणाची तयारी महिला वर्ग करत असतात . माहेरवाशीण तर नव्यानेच लग्न होऊन आलेल्या नव तरुणींचा हा उत्सव ” सात जन्मी हाच वर मला हवा ” असे म्हणून वड वृक्षाला पूजन करून पाच फळ , पुरण पोळीच नैवेद्य देऊन धागा घेऊन सात फेऱ्या मारल्या जातात , हि लगबग सकाळपासूनच सुरू असताना ऐन मोक्यालाच कर्जत वीज कंपनीने सकाळपासूनच वीज घालून ” बत्ती गुल ” केल्याने महिलांचा संताप अनावर झाला.


कर्जत वीज कंपनीचे उप कार्यकारी अभियंता केंद्रे यांनी नेमक्या ” वट पौर्णिमेच्या ” याच दिवशी कर्जत फिडर वर कामाचे नियोजन केले , म्हणूनच कित्ती ” मतिमंद अक्कल नसलेले ” हे अधिकारी असतील , अशी संतप्त प्रतिक्रिया भिसेगाव प्रभाग येथील अनेक महिलां भगिनींनी व्यक्त केल्या .

- Advertisment -

You cannot copy content of this page