if(isset($image4)); {?>
} ?>
if(isset($image5)); {?>
} ?>
अनेक महिला भगिनींची कागदपत्रे अर्धवट रिजेक्तेड माहिती उशिरा समजल्याने सर्वांचीच धावपळ..
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून साकारलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ०१ जुलै २०२४ रोजी अंमलात आली . त्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट रोजी संपत असून या कालावधी पर्यंत ज्या महिला भगिनी अर्ज भरून त्यात समाविष्ट असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करतील , त्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे . मात्र या योजनेतील महिला भगिनींना आपले अर्ज रिजेक्तेड झाल्याचे उशिरा मेसेज किंवा माहिती मिळाल्याने उर्वरित चार दिवसांत त्याची पूर्तता होणार नसल्याने , या महत्त्वपूर्ण योजनेची मुदत अजून वाढविण्याची मागणी महिला वर्गातून जोर धरू लागली आहे.
या महत्त्वपूर्ण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी शाळा सोडल्याचा दाखला , केसरी किंवा पिवळे रेशनकार्ड , आधार कार्ड , रहिवासी दाखला , बँक खाते पासबुक , आदी कागदपत्रे लावण्याचे बंधन होते . मात्र यामध्ये अनेकांचे शाळा सोडल्याचे दाखले उपलब्ध नसल्याने जिथे शाळा सोडली तिकडे जाऊन त्यांना आणावे लागले . तर अनेक नवीन लग्न झालेल्या महिलांची माहेरच्या रेशन कार्ड मधून नावे कमी करणे , नवीन नावाचे लग्न प्रमाणपत्रे तयार नव्हती त्यामुळे सासरच्या नावाचे आधारकार्ड बनले गेले नव्हते , त्या कामास देखील खूप अवधी गेला . अजूनही ही कामे झाली नसल्याने रेशन कार्ड मध्ये देखील त्यांची नावे अद्यापी समाविष्ट होण्याची प्रक्रिया अजून बाकी आहे . तर बँक खाते देखील अनेकांनी मोबाईल लिंक , आधार कार्ड सिडिंग झाल्याची प्रक्रिया अद्यापी झाली नसल्याने बँकांत रोजच्या रोज गर्दी दिसत आहे . त्यातच बँकेत नेहमीची कामे , वीज खंडित होणे , गर्दीचे प्रमाण , नेट स्लो चालणे , शासकीय सुट्टया यामुळे अद्यापी सर्व महिला भगिनिंच्या समस्या ” आ ” वासून उभ्या आहेत.
त्यातच ज्या ज्या समस्या अर्धवट आहेत , त्या रीजेक्तेड झालेल्या अर्जाची माहिती उशिरा महिलांना समजल्याने आत्ता चार दिवसांत या प्रक्रिया पूर्ण होतील का ? अशी शंका असल्याने ३१ ऑगस्ट पर्यंत असलेली मुदत कमी पडत असल्याने मुदत वाढवून मिळावी , अश्या मागणीचा जोर महिला वर्गातून वाढत आहे.